इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन
(संपादक सुरेश गुप्ता)
उरुळी कांचन, (पुणे) : अंगणाजवळील कालव्याच्या शेजारी खेळतअसताना साडेतीन ते चार वर्षे वयोगटातील तीन चिमुकल्यांनी पाण्यात उड्या मारल्याची घटना घडली आहे. या घटनेत दोघा मुलांना वेळीच बाहेर काढून जीव वाचवण्यात यश आले असले, तरी एक चिमुकला अद्याप बेपत्ता असल्याची माहिती मिळाली आहे.
सहजपुर (ता. दौंड) ग्रामपंचायत हद्दीत शनिवारी (ता.19) सकाळी आठ ते साडेआठ वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली आहे. या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे.
बेपत्ता मुलाचा शोध घेण्यासाठी शोधमोहीम सुरू असून, घटनास्थळी यवत पोलीस दाखल झाले आहेत. पाण्यात पडलेल्या चिमुकल्यांची नावे व इतर माहिती अद्याप उपलब्ध होऊ शकलेली नाही