Sunday, June 8, 2025
Homeक्राईम न्यूजपहलगाम हल्ल्यानंतर रेल्वे विभाग अलर्ट; तब्बल 24 एक्सप्रेस रेल्वेमध्ये विशेष सुरक्षा व्यवस्था

पहलगाम हल्ल्यानंतर रेल्वे विभाग अलर्ट; तब्बल 24 एक्सप्रेस रेल्वेमध्ये विशेष सुरक्षा व्यवस्था

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन

(संपादक सुरेश गुप्ता)

पुणे : जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात भारतातील 26 निष्पाप पर्यटकांचा मृत्यू झाला.या हल्ल्यानंतर रेल्वे विभाग अलर्ट मोडवर आला आहे. सुरक्षेच्या दृष्टीने पुण्यासह मिरज, कोल्हापूर या महत्त्वाच्या स्थानकांच्या सुरक्षा वाढवण्यात आल्या आहेत. पुणे विभागात धावणाऱ्या २४ एक्स्प्रेस रेल्वेमध्ये विशेष सुरक्षा व्यवस्था तैनात केली आहे. संभाव्य धोक्यांवर लक्ष ठेवून अधिक कडक सुरक्षा उपाययोजना राबविल्या आहेत.

पहलगाम हल्यानंतर शासकीय यंत्रणा सतर्क झाल्या असून, रेल्वे विभागाने सुरक्षा व्यवस्थेचा फेरआढावा घेण्यास सुरुवात केली आहे.

पुणे स्थानकाला संवेदनशील स्थानक म्हणून घोषित केले आहे. तेथे अतिरिक्त निरीक्षकाची नियुक्ती केली आहे. वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून नियमित स्थानकांची अनपेक्षित तपासणी केली जात आहे. सीसीटीव्ही कॅमेऱ्यांद्वारे लक्ष ठेवले जात आहे. सुरक्षा बल आणि रेल्वे पोलिसांच्या समन्वयाने स्थानकांच्या सुरक्षेचा आढावा घेतला जात आहे.

दरम्यान सुरक्षेच्या दृष्टीने पुणे विभागातील सुमारे २४ महत्त्वाच्या मेल व एक्स्प्रेस गाड्यांमध्ये एस्कॉर्टिंग व्यवस्था करण्यात आली आहे. सुरक्षा बलाचे निरीक्षक आपापल्या कार्यक्षेत्रातील गाड्यांमध्ये गस्तीचे काम करत आहेत.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments