Thursday, July 31, 2025
Homeक्राईम न्यूज500 वर्ष जुन्या मंदिरांचे नूतनीकरण संथगतीने; एकवीरा देवी मंदिराचे काम रखडले, 2...

500 वर्ष जुन्या मंदिरांचे नूतनीकरण संथगतीने; एकवीरा देवी मंदिराचे काम रखडले, 2 वर्षांत फक्त 1 मंदिराचे काम पूर्ण

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन

(संपादक सुरेश गुप्ता)

पुणेः महाराष्ट्रातील 500 वर्षांपेक्षा जास्त जुन्या झालेल्या मंदिरांच्या दुरुस्तीचे मोठे काम खूपच हळू सुरू आहे. पहिल्या टप्प्यातील 9 प्रमुख मंदिरांपैकी आतापर्यंत केवळ रत्नागिरी जिल्ह्यातील राजापूर येथील धूतपापेश्वर मंदिराचेच नूतनीकरण पूर्ण झाले आहे. इतर 8 मंदिरांची कामे अजूनही अपूर्ण असून, ती पूर्ण करण्यासाठी डिसेंबर 2026 उजाडण्याची शक्यता आहे.

सरकारने हाती घेतलेल्या या महत्त्वाकांक्षी योजनेला दोन वर्षांहून अधिक काळ लोटला आहे. राज्यातील या प्राचीन मंदिरांना नवसंजीवनी देण्याचा निर्णय राज्य शासनाने सुमारे तीन वर्षांपूर्वी घेतला होता. या कामाची जबाबदारी महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाकडे (MSRDC) सोपवण्यात आली होती. मंदिरांची पडझड झालेली छत, संरक्षक भिंती आणि इतर भागांची दुरुस्ती करताना त्यांची मूळ स्थापत्यशैली कायम ठेवणे हे मोठे आव्हान ठरले आहे. दरम्यान, अजून फक्त एका मंदिराचे नूतनीकरण करण्यात आले आहे.

समोर आलेल्या माहितीनुसार, या कामासाठी सुमारे 125 कोटी रुपयांच्या निविदा काढण्यात आल्या. यादीतील सर्व मंदिरे राज्याचा समृद्ध इतिहास दर्शवतात. त्यामुळे त्यांच्या मूळ बांधकामाला धक्का न लावता, अत्यंत बारकाईने दुरुस्तीची कामे करावी लागत आहेत. यात पुणे जिल्ह्यातील कार्ला येथील एकवीरा देवी मंदिर, बीडमधील पुरुषोत्तमपुरी आणि कोल्हापूर जिल्ह्यातील कोपेश्वर मंदिर या प्रमुख मंदिरांचा समावेश आहे. धूतपापेश्वर मंदिराचे काम पूर्ण झाले असले, तरी उर्वरित कामांना अपेक्षित वेग मिळत नसल्याने भाविकांकडून चिंता व्यक्त होत आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments