Sunday, June 8, 2025
Homeक्राईम न्यूजशिवारफेरीचे काम १५ मेपर्यंत पूर्ण करा : जिल्हाधिकारी डुडी

शिवारफेरीचे काम १५ मेपर्यंत पूर्ण करा : जिल्हाधिकारी डुडी

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन

(संपादक सुरेश गुप्ता)

पुणेः जलयुक्त शिवार अभियानाच्या अनुषंगाने शिवारफेरीचे काम १५ मेपर्यंत पूर्ण करावे. यात ग्रामपंचायत सदस्य, ग्रामस्थ आदींना सहभागी करुन घ्यावे. जी नवीन, दुरूस्तीची कामे या योजनेत समाविष्ट करणे आवश्यक असल्याचे आढळून आले आहे. त्यांच्या सविस्तर नोंदी घेऊन अंदाजपत्रके तयार करावीत, असे निर्देश जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी दिले.

जलयुक्त शिवार अभियान, गाळमुक्त धरण, गाळयुक्त शिवार बाबत आढावा बैठकीत ते बोलत होते. याप्रसंगी पुणे वनविभागाचे उप वनसंरक्षक महादेव मोहिते, जुन्नर वनविभागाचे उपवनसंरक्षक अमोल सातपुते, जिल्हा जलसंधारण अधिकारी सुजाता हांडे, भूजल सर्वेक्षण व विकास यंत्रणेचे वरिष्ठ भूवैज्ञानिक दिवाकर धोटे आदी उपस्थित होते.

जिल्हाधिकारी जितेंद्र डूडी म्हणाले, शिवारफेरीमध्ये प्रत्यक्ष गावात भेटी देऊन नोंद असलेल्या अस्तित्वातील मृद व जलसंधारण संरचनांची स्थळ पडताळणी करण्यासह नोंद नसलेल्या मात्र नव्याने आढळलेल्या संरचनांची नोंद घेण्यात येणार आहे. पडताळणी व नोंद केल्यानंतर सद्यस्थिती व उपयुक्ततेबाबत माहिती मोबाईल अॅपमध्ये अचूकपणे भरण्याचे काम करावे. लघुसिंचन योजनांची ७ वी प्रगणनाही शिवारफेरीच्या वेळीच करून घ्यावी.

गाळमुक्त धरण, गाळयुक्त शिवार, नाला खोलीकरण व रुंदीकरण अंतर्गत प्रस्तावित करण्यात आलेल्या ६८ लाख ६६ हजार घन मीटर गाळ काढण्याच्या २२० कामांना प्रशासकीय मान्यता तात्काळ द्यावी, असे त्यांनी सांगितले.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments