इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन
(संपादक सुरेश गुप्ता)
मुंबई : आषाढी एकादशीनिमित्त वारीत सहभागी होणाऱ्या वारकऱ्यांना संरक्षण देण्यासाठी त्यांचा समूह विमा काढण्यात येईल, तसेच वारकऱ्यांना दरवर्षीप्रमाणे याही वर्षी वैद्यकीय सेवा पुरवण्यात येणार आहेत, असं राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटल आहे. काल सह्याद्री अतिथीगृहात राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली विशेष बैठक पार पडली. ही बैठक आषाढी वारीनिमित्त केलेल्या उपाययोजना आणि वारकऱ्यांना भेडसावणाऱ्या विविध समस्या यांचा आढावा घेण्यासाठी पार पडली. त्याविषयीची अधिक माहिती देताना माध्यमांशी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे बोलत होते.
राज्यभरात झालेल्या मुसळधार पावसामुळे वारी मार्ग कुठे खराब झाला असेल त्या ठिकाणी मुरूम, खडी आणि डांबरीकरण करून त्याची तातडीने त्या रस्त्याची डागडुजी करण्यात येणार आहे. तसेच रस्त्याने वारकऱ्यांना मुबलक पाणी, विज पुरवठा, पालखी तळावर वॉटरप्रूफ तंबू उपलब्ध करून करून दिले जाणार आहेत. तसेच दरवर्षीप्रमाणे वारीसाठी जाणाऱ्या वारकऱ्यांच्या गाड्यांना टोलमध्ये सवलत दिली जाणार असल्याचंही, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी सांगितलं आहे.
राज्यातील प्रत्येक जिल्ह्यातून येणाऱ्या मोठ्या दिड्यांना वारी दरम्यान पूर्णवेळ सुसज्ज रुग्णवाहिका उपलब्ध करून द्यावी, असंही उपमुख्यमंत्र्यांनी सांगितलं आहे.
गतवर्षी वारीमध्ये अपघातात होऊन मृत्युमुखी पडलेल्या वारकऱ्यांना शासनाद्वारे मदत केली जाईल. तसेच वारकऱ्यांचे भोजन आणि इतर प्रथा वेळीच पार पडाव्यात यासाठी वारीला काही अडचण येणार नाही. यासाठी प्रशासनाकडून प्रयत्न केला जाईल. आवश्यक ते सर्व सहकार्य शासन-प्रशासनाकडून केलं जाईल, अस राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे.