इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन
(संपादक सुरेश गुप्ता)
मुंबई : आज सकाळी मुंबईत एक दुर्दैवी घटना घडली आहे. पुष्पक एक्स्प्रेस ट्रेनमधून काही प्रवासी रेल्वे रुळावर पडल्याने संपूर्ण महाराष्ट्र हादरला आहे. या दुर्दैवी घटनेत 8 प्रवासी रुळावर पडले होते ज्यामध्ये 6 प्रवाशांचा मृत्यू झाला असल्याची माहिती समोर येत आहे.
दिवा ते मुंब्रा स्थानकादरम्यानवर ही घटना घडली. अचानक प्रवासी रुळावर कसे पडले? हा अपघात कसा झाला? याची संपूर्ण माहिती आता समोर आली आहे. खरं तर सकाळी जेव्हा ही घटना घडली तेव्हा गर्दीमुळे प्रवासी खाली पडले असावे असा अंदाज वर्तवला जात होता. परंतु ताज्या अपडेटनुसार दोन लोकल एकमेकांच्या अगदी जवळून गेल्यामुळे पुष्पक एक्स्प्रेस लोकलमधील प्रवाली खाली पडले असल्याचे सांगण्यात येत आहे.
एक लोकल कसाऱ्याच्या दिशेनं येत होती. तर, दुसरी लोकल सीएसएमटीच्या दिशेनं जात होती. यादरम्यान, गर्दीमुळे दारावर लटकून उभे असलेले प्रवासी रुळावर पडले आणि ही दुर्दैवी घटना घडली. सध्या जखमींवर उपचार सुरु असून, मृत्यूच्या आकड्यात वाढ होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
दरम्यान, रेल्वे जनसंपर्क अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, रूळावर पडलेले प्रवासी हे लोकलच्या फुटबोर्डवर उभे होते. आणि विरूद्ध दिशेने येणारी धावती लोकल जवळून गेली. यादरम्यान, प्रवासी एकमेकांना धडकले. प्रवाशांचा तोल गेला आणि प्रवासी खाली पडले. ज्यामुळे ही घटना घडली असल्याचं अधिकाऱ्यांनी सांगितलं आहे.