इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन
(संपादक सुरेश गुप्ता)
लातूर : आज पहाटे पुण्यावरून लातूरला येणाऱ्या दोन ट्रॅव्हल्समध्ये भीषण अपघात झाला आहे. हा अपघात इतका भीषण होता की, या अपघातात 15 ते 20 जण गंभीर जखमी तर दोघांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, पुण्यावरून लातूरकडे येत असलेल्या एका ट्रॅव्हल्सने दुसऱ्या ट्रॅव्हल्सला पाठीमागून धडक दिली आहे. हा अपघात तुळजापूर-लातूर या राष्ट्रीय महामार्गावरील आशीव पाटी येथे झाला आहे. अपघातात 15 ते 20 जण गंभीर जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे. या अपघातात आतापर्यंत दोघांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे.
दरम्यान या अपघातस्थळी पोलीस दाखल झाले आहेत. आत्तापर्यंत 5 रुग्णवाहिका अपघात स्थळी दाखल झाल्या आहेत. रुग्णांना लातूरच्या शासकीय रुग्णालयात हलवण्याचे काम सुरू आहे.