इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन
(संपादक सुरेश गुप्ता)
कोल्हापूरः कोल्हापूर जिल्ह्यातील इचलकरंजी येथे एका धक्कादायक घटनेत 20-22 जणांनी चार तरुणांवर क्रूर हल्ला केल्याचे समोर आले आहे. फळकूट दादा टोळीतील २०-२२ सदस्यांच्या गटाने जवाहरनगर परिसरात गप्पा मारत बसलेल्या 4 तरुणांवर काठ्या लोखंडी रॉड आणि प्राणघातक शस्त्रांनी भयंकर हल्ला केला. मागील काही दिवसांपासून परिसरातील दोन टोळ्यांमध्ये भांडण सुरु होते. दरम्यान, एका गटाने हाणामारी केल्यानंतर दुसऱ्या गटाने हल्ला केला. फळकूट दादा गँगचे पोरं सोमवारी रात्री ११ वाजेच्या सुमारास दुचाकीवरून पोहोचले आणि दुसऱ्या गटाचे ४ तरुण गप्पा मारत असतांना त्यांच्यावर हल्ला केला.
पीडितांना चाकू, लोखंडी रॉड आणि काठ्यांनी निर्दयीपणे मारहाण करण्यात आली, ज्यामध्ये तिघे गंभीर जखमी झाले. ही घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली, ज्यामुळे तपासासाठी महत्त्वाचे पुरावे मिळाले आहेत. पोलिसांनी या घटनेची तातडीने दखल घेतली आणि २२ जणांना ताब्यात घेतले. गुन्हेगारांची ओळख पटविण्यासाठी आणि हल्ल्यामागील हेतू शोधण्यासाठी सखोल चौकशी सुरू आहे.