Saturday, March 15, 2025
Homeक्राईम न्यूजमहावितरणच्या 'अभय' योजनेची मुदत मार्च अखेरपर्यंतच

महावितरणच्या ‘अभय’ योजनेची मुदत मार्च अखेरपर्यंतच

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन

(संपादक सुरेश गुप्ता)

पुणेः वीजबिलांची थकबाकी असलेल्या एखाद्या जागेची मालकी बदलल्यानंतर देखील नवीन जागामालक किंवा ताबेदारांना थकबाकीची रक्कम भरावी लागेल, असा निकाल सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे. त्यामुळे जागावापरासह विजेची गरज असो किंवा नसो; मात्र वीजबिलांच्या थकबाकीतून मुक्त होण्याची संधी महावितरणच्या ‘अभय’ योजनेंतर्गत घरगुती, वाणिज्यिक, औद्योगिक व इतर अकृषक ग्राहकांना येत्या मार्चपर्यंत उपलब्ध झाली आहे.

दरम्यान, पुणे प्रादेशिक विभागामध्ये या योजनेत सहभागी २९ हजार ५०१ पैकी १७ हजार २६१ वीजग्राहकांनी सध्या विजेची गरज नसतानाही योजनेचा लाभ घेऊन थकबाकीमुक्ती मिळवली आहे. तर, १० हजार १३५ वीजग्राहकांकडे विजेची पुनर्जोडणी करण्यात आली आणि ५९०८ ग्राहकांना नवीन वीजजोडणी देण्यात आली आहे. वीजबिलांच्या थकबाकीमुळे ३१ मार्च २०२४ पर्यंत कायमस्वरूपी वीजपुरवठा खंडित झालेल्या तसेच कृषी व सार्वजनिक पाणीपुरवठा योजना वगळून उर्वरित सर्व अकृषक वीजग्राहकांसाठी महावितरण अभय योजना ३१ मार्च २०२५ पर्यंत सुरू राहणार आहे.

महावितरण अभय योजनेनुसार थकबाकीदारांनी केवळ मूळ थकबाकीचा भरणा केल्यास संपूर्ण १०० टक्के व्याज व विलंब आकाराची (दंड) रक्कम माफ होत आहे. तसेच मूळ थकबाकीचा एकरकमी भरणा केल्यास लघुदाब ग्राहकांना आणखी १० टक्के तर उच्चदाब ग्राहकांना आणखी ५ टक्के सूट मिळत आहे. यासोबतच मूळ थकबाकीची सुरुवातीला ३० टक्के रक्कम भरून उर्वरित – ७० टक्के रक्कम व्याजमुक्त सहा हप्त्यांत भरण्याचीदेखील सोय आहे. थकबाकीमुक्तीसाठी वीजग्राहकांनी य या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन पुणे प्रादेशिक संचालक भुजंग खंदारे यांनी केले आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments