Saturday, March 15, 2025
Homeक्राईम न्यूजतुम्ही देखील भाज्या-फळे कागदात बांधून ठेवताय? तर 'ही' माहिती ठरू शकते फायद्याची...

तुम्ही देखील भाज्या-फळे कागदात बांधून ठेवताय? तर ‘ही’ माहिती ठरू शकते फायद्याची…

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन

(संपादक सुरेश गुप्ता)

पुणे: आपल्यापैकी अनेकांनी फळे अथवा पालेभाज्या कागदात बांधून ठेवल्याचे पाहिले असेल. ही एक योग्य पद्धत देखील मानली जाते. आहारात हिरव्या भाज्या आणि फळांचा समावेश केल्याने शरीराला अनेक पोषक तत्वे मिळतात. विशेषतः सर्व वयोगटातील लोकांना दररोज एक किंवा दोन फळे खाण्याचा सल्ला तज्ज्ञ देतात.

द्राक्षे, संत्रा, सफरचंद, पपई, पेरू अशी अनेक फळे उपलब्ध आहेत. फळ विक्रेते किंवा आपणही काही फळे कागदात किंवा वर्तमानपत्रात गुंडाळून टोपली किंवा गाडीत ठेवतो. कागदात गुंडाळल्याने फळे सुरक्षित आणि ताजी राहतात. याच्या मदतीने तुम्ही फळे जास्त दिवस साठवू शकता. अनेक वेळा फळे थेट सूर्यप्रकाशात ठेवल्याने ते लवकर खराब होतात. वृत्तपत्र हे इन्सुलेटरसारखे काम करते, त्यामुळे उष्ण तापमानात फळे खराब होण्यापासून वाचवतात. वास्तविक, कागद बायोडिग्रेडेबल असल्यामुळे फळांच्या पॅकेजिंगमध्ये त्याचा वापर केला जातो. प्लास्टिकसह पॅकेजिंगमुळे पर्यावरणाची हानी होते. त्यामुळे कागदाचा वापर फायद्याचा ठरू शकतो.

कागदात नीट गुंडाळून ठेवल्यास पिकलेली फळे धक्का किंवा वारंवार स्पर्शाने फुटत नाहीत किंवा खराब होत नाहीत. विशेषतः फळे कच्ची असतील तर कागदात गुंडाळून ठेवल्यास ती लवकर पिकण्यास मदत होते. त्यातच, लोक सहसा कच्ची फळे पटकन विकत घेत नाहीत. त्यामुळे फळ विक्रेते कच्ची पपई, संत्री, पेरू इत्यादी कागदात गुंडाळून ठेवताना दिसते. पण, कागदात फळे अथवा भाजी ठेवल्यास त्याने फायदाच होऊ शकतो.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments