Monday, December 11, 2023
Home क्राईम न्यूज आज मनोज जरांगे पाटील यांना दिल्या जाणाऱ्या पत्रात काय असणार?

आज मनोज जरांगे पाटील यांना दिल्या जाणाऱ्या पत्रात काय असणार?

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन

(संपादक सुरेश गुप्ता)

जालना : मराठा आरक्षण आंदोलनाच्या मागणीसाठी जालन्यात अंतरवली-सराटी येथे मनोज जरांगे पाटील यांचं आमरण • उपोषण सुरु आहे. आज त्यांच्या आमरण उपोषणाचा नववा दिवस आहे. काल रात्रीपासून मनोज जरांगे पाटील यांनी पाणी पीण बंद केलय. मनोज जरांगे पाटील यांनी काल माध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी त्यांनी मराठा समाजाला आरक्षण द्यायला अजून कितीवेळ लागणार? सरसकट मराठा समाजाला आरक्षण देणार का? हे प्रश्न विचारले होते. त्याचवेळी मनोज जरांगे पाटील यांनी सरकारशी चर्चा करण्याची देखील तयारी दाखवली होती. सरकारच्यातीने आज शिष्टमंडळ मनोज जरांगे पाटील यांना भेटणार असल्याची माहिती आहे. मनोज जरांगे पाटील यांना आज एक पत्र सुद्धा दिलं जाईल. या पत्रात काय असेल? त्या बद्दल जाणून घ्या.

आम्हाला अर्धवट आरक्षण नको अशी मनोज जरांगे पाटील यांची भूमिका आहे. ‘आरक्षण मिळेपर्यंत आंदोलन थांबणार नाही’ असा निर्धारही त्यांनी बोलून दाखवलाय. “आणखी कशासाठी वेळ पाहिजे. हे त्यांनी इथे येऊन महाराष्ट्राला सांगाव. त्यानंतर आम्ही विचार करु” असं मनोज जरांगे पाटील बुधवारी माध्यमांशी बोलताना म्हणाले. आरक्षण मिळवूनच राहणार असा विश्वास त्यांनी व्यक्त केलाय. काल राज्य सरकारवर त्यांनी टीका सुद्धा केली. मनोज जरांगे पाटील यांनी आंदोलनाला सुरुवात केल्यानंतर पहिले सहा दिवस ते पाणी प्याले नव्हते त्यामुळे ते स्टेजवरच कोसळले होते. आता सुद्धा त्यांनी पाणी बंद केलय.

मनोज जरांगे यांना आज दिल्या जाणाऱ्या पत्रात काय असणार?

1) काल झालेल्या सर्वपक्षीय बैठकीचा ठराव मनोज जरांगे यांना दिला जाणार

2) मराठा आरक्षण देण्यासाठी वेळ वाढवून मागितला जाणार.

3) अंतरवली सराटीत जे गुन्हे दाखल झाले ते मागे घेण्याचा कृती कार्यक्रम.

4) मनोज जरांगे यांच्या सभेदरम्यान 441 शेतकऱ्यांच्या पिकाचे

नुकसान झाले. त्यांना नुकसान भरपाई.

5) ज्यांच्या नोंदी सापडल्या त्यांना आणि त्यांच्या नातेवाईकांना

कुणबी प्रमाणपत्र देण्याची प्रक्रिया सुरू करणे.

6) मनोज जरांगे यांना उपोषण मागे घेण्याची विनंती.

7) मराठा समाजाला तातडीने मागास ठरविण्यासाठी प्रक्रिया सुरू करणे

या सर्व मुद्द्यांसाह आणखी 4 मुद्दे पत्रात असतील.

RELATED ARTICLES

‘या’ बँकेत भरती प्रक्रिया सुरू, ‘ही’ आहे अर्ज करण्याची शेवटची तारीख, लगेचच करा अर्ज

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन (संपादक सुरेश गुप्ता) मुंबई : पदवीधरांसाठी मोठी संधी आहे. विशेष म्हणजे तुम्ही कोणत्याही विषयात पदवी घेतली असेल तरीही तुम्हाला थेट बँकेत नोकरी...

पिंपरी चिंचवड महापालिकेतील अधिकाऱ्यांवर आयुक्तांचा नाही अंकुश, प्रशासनाबाबत तक्रारी

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन (संपादक सुरेश गुप्ता) पिंपरी : महापालिकेच्या कारभारावर आयुक्तांचा अंकुश नसल्याचा आरोप होत आहे. विविध विभागांचे प्रमुख तसेच अधिकारी काम करत नसल्याच्या तक्रारी...

एक दिवसासाठी काम बदलले अन् जीव वाचला! आगीतून वाचलेल्या रेणुका ताथोड यांची ‘आपबीती’

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन (संपादक सुरेश गुप्ता) पिंपरी : "दररोज स्पार्कल कँडलला स्टिकर लावण्याचे काम करायचे. पण, शुक्रवारी स्पार्कल कँडलला टोपण लावायचे काम दिले. त्यामुळे आग...

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

‘या’ बँकेत भरती प्रक्रिया सुरू, ‘ही’ आहे अर्ज करण्याची शेवटची तारीख, लगेचच करा अर्ज

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन (संपादक सुरेश गुप्ता) मुंबई : पदवीधरांसाठी मोठी संधी आहे. विशेष म्हणजे तुम्ही कोणत्याही विषयात पदवी घेतली असेल तरीही तुम्हाला थेट बँकेत नोकरी...

पिंपरी चिंचवड महापालिकेतील अधिकाऱ्यांवर आयुक्तांचा नाही अंकुश, प्रशासनाबाबत तक्रारी

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन (संपादक सुरेश गुप्ता) पिंपरी : महापालिकेच्या कारभारावर आयुक्तांचा अंकुश नसल्याचा आरोप होत आहे. विविध विभागांचे प्रमुख तसेच अधिकारी काम करत नसल्याच्या तक्रारी...

एक दिवसासाठी काम बदलले अन् जीव वाचला! आगीतून वाचलेल्या रेणुका ताथोड यांची ‘आपबीती’

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन (संपादक सुरेश गुप्ता) पिंपरी : "दररोज स्पार्कल कँडलला स्टिकर लावण्याचे काम करायचे. पण, शुक्रवारी स्पार्कल कँडलला टोपण लावायचे काम दिले. त्यामुळे आग...

कसबा पेठेतील तीन मजली जुन्या महाजन वाड्याला भीषण आग लागली.

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन (संपादक सुरेश गुप्ता) पुणे : कसबा पेठेतील मोटे मंगल कार्यालयाजवळील तीन मजली जुन्या महाजन वाड्याला सोमवारी पहाटे ४ वाजता भीषण आग लागली....

Recent Comments